Online Lectures शाप की वरदान?
'न हि ज्ञाने सदृशं पवित्रमिह विद्यते' अर्थात ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगात कोणतीही नाही, असं आजही ज्ञानाबद्दल बोलले जाते.आजच्या विज्ञान युगाला तंत्रज्ञानाची जोड न दिल्यास आधुनिक युगाची अयोग्य व्याख्या केल्यासारखे आहे .विविध शाळा,महाविद्यालये,विद्यापीठे यांमध्ये एक नवीनच पद्धत उदयास आली आहे.आपण त्याचा online classes, virtual classes, flipped classes किंवा उत्प्रेक्षी वर्ग या गोंडस नावाने गौरव करतो.
या तंत्रज्ञानाचे फायदे:आज विज्ञान तंत्रज्ञानामूळे सर्व ज्ञान बोटांच्या साहाय्याने अगदी चुटकीसरशी क्षणार्धात मिळते. या तंत्रज्ञानाचा वापर आजची शिक्षणप्रणाली विकसित करण्यासाठी केला जातो आहे.यामध्ये आपली कामगिरी उत्तम व्हावी यासाठी दिलेले प्रशिक्षण असते.Online classes हि पद्धती आज खूप लोकप्रिय झाली आहे.या उत्प्रेक्षी वर्ग संकल्पनेत आपल्याला इंटरनेट ,LCD/संगणक या उपकरणांद्वारे एक शिक्षक व विदयार्थ्यांना उत्साहपूर्वक एका जागी खिळून ठेवण्याची सोय दिलेली असते.आजच्या प्रगत काळात गुरुकुल मधील पारंपारिक शिक्षणाबरोबरच आजच्या online classes ची जोड देणे अत्यावश्यक ठरले आहे.
सध्या online courses चे वाढते प्रस्थ पाहून आजच्या महाविद्यालये,विद्यापीठांनीसुद्धा Flipped Classroom ची सुविधा सुरु केली आहे.
1.या वर्गात अभ्यास करताना पाठय -पुस्तक किंवा संदर्भ ग्रंथाची तसेच कोणत्या नोट्स किंवा इतर अभ्यासेत्तर साहित्य शोधण्यासाठी तारांबळ उडत नाही.
2.अध्यनकर्ता स्वेच्छेने जगाच्या कानाकोपऱ्यात बसून कुठेही काहीही कधीही कितीही वेळा शिकू शकतो.अशी ही काळ ,वेळ,स्थळ असे निर्बन्ध मुक्त सुविधा आहे.
3.विविध संदर्भ ग्रंथ, नियतकालिके,वृत्तपत्रे,संशोधन पत्रिका त्वरित खरेदी करणे शक्य नसते,किंवा आर्थिकदृष्टया परवडणारे नसते...online वर्ग ही या बाबतीत परवडणारी गोष्ट आहे.
4.विद्यार्थी आवश्यकतेनुसार ज्ञानाची खोली ,ज्ञानाची उजळणी,कुवतीनुसार गृहपाठ,प्रगतीसाठी आवश्यक सूचना,सर्वंकष मूल्यमापनासाठी आवश्यक त्या चाचण्या ,एखादा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांचे प्रमाणपत्र देणे ,एख्याद्या कौशल्याची निर्मिती करणे, यातुन व्यावसायिक वृद्धीस मदत करणे
5.याचबरोबर भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य,गरजेनुरूप विश्रांती ,आवश्यकतेनुसार अध्यापनात लवचिकता आणणे व विद्यार्थ्यांवरील कामाचा बोझ कमी करणे इत्यादी सुविधांचा विचार उत्प्रेक्षी वर्गामध्ये केला जातो.
5.याचबरोबर भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य,गरजेनुरूप विश्रांती ,आवश्यकतेनुसार अध्यापनात लवचिकता आणणे व विद्यार्थ्यांवरील कामाचा बोझ कमी करणे इत्यादी सुविधांचा विचार उत्प्रेक्षी वर्गामध्ये केला जातो.
6. क्लिष्ट ,किचकट वाटणाऱ्या संकल्पना सहज शिकणे सोयीचे करणे यामुळे सोपे जाते.
7.थोडक्यात विद्यार्थ्यास केंद्रस्थानी ठेवून या सुविधेची निर्मिती केली आहे.
'अति सर्वत्र वज्यते' हि उक्ती लागू होतेच.
हेच तंत्रज्ञान शाप युक्त ठरते -
हेच तंत्रज्ञान शाप युक्त ठरते -
1.जेव्हा विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर वेबसाइट सर्च करतात ,त्याचे घातक परिणाम त्यांच्या जीवनावर होतात. 'The Flipped Classroom is mindset not a method'. असं कोणीतरी म्हटलेच आहे .या विधानाचा विचार करणं आवश्यक वाटतं ,खरंच Online classes ची नित्यनियमित जीवनात आवश्यकता भासते काय?
2.Online Classes म्हणून यांचा स्क्रीन वेळ भरमसाठ वाढणार....त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या डोळे व मेंदूवर होणार.
3.आम्ही ऑनलाइन अभ्यास करतो याचे समाज माध्यमावर फोटो टाकले जातात. एकंदरीत काय, ' रात्र थोडी सोंगे फार ' अशी अवस्था आजच्या विद्यार्थ्यांची झाली आहे .
3.आम्ही ऑनलाइन अभ्यास करतो याचे समाज माध्यमावर फोटो टाकले जातात. एकंदरीत काय, ' रात्र थोडी सोंगे फार ' अशी अवस्था आजच्या विद्यार्थ्यांची झाली आहे .
4.सगळ्याच गोष्टी 'युट्यूब 'वर मिळतात.कशाला लक्षात ठेवा...त्यामुळे साहजीकच मुले आपली बुद्धी वापरतच नाहीत.
5.आजच्या पिढीला सर्वकाही त्वरित तयार गोष्टी पुरवून त्यांना संयमाचे धडे देण्याकडे आपण साफ दुर्लक्ष करत आहोत.
6.Zoom, Youtube, skype यांमुळे शिक्षकांची गरजच संपते साहजिकच विद्यार्थी गैरहजेरीचे .प्रमाण वाढते चांगल्या शिक्षकाची जागा तंत्रज्ञान कधीच घेऊ शकत नाही परंतु चांगले शिक्षक या तंत्रज्ञानात उत्तम वापर करू शकतात याचा विसर शिक्षकच मुलांना पाडत तर नाहीत ना ... अशी चिंता वाटते.अनेक तज्ञांचे असे मत आहे की शांततेत सृजनशीलता फुलते .त्यांना वेळ देऊन नवीन कल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचे कार्य घडू शकते. स्वतःच्या चुकांतून अनुभवातून शिक्षण मोलाचे ठरते.
7.ऑनलाइन अभ्यास नाही केला तरी आपली मुले अभ्यासात मागे राहतील अशी बिनबुडाची भीती पालकांच्या मनात निर्माण करून काही लोक पैसेक असे करत नसतील ?
8.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा नसते, गरिबीमूळे इंटरनेट प्लॅन खरेदी करणे ते आवाक्याबाहेरचे असते.
9. याचबरोबर ग्रामीण भागात वीज तुटवडा ही गंभीर समस्या असते .
9. याचबरोबर ग्रामीण भागात वीज तुटवडा ही गंभीर समस्या असते .
10. व्यक्ती वर्गातील शिस्त नियम येथे राखली जात नाही विज्ञान कला यांची प्रात्यक्षिके उपकरणांशिवाय करणे निव्वळ अशक्य आहे .
11.वर्गातील साहचर्ययुक्त अध्यापनाच्या आनंदाला आजचा विद्यार्थी मुकतो आहे .
एकंदरीत ज्ञानपिपासूंची क्षुधा भागवण्यासाठी एकाच पद्धतीचा अवलंब न करता त्यामध्ये -साहचर्य युक्त अध्यापन, विचारविमर्ष पद्धती ,सामाजिक कौशल्य वृद्धी, विद्यार्थ्यांना प्रेरणा ,आवड उत्सुकता निर्माण करणारे शिक्षण ,विद्यार्थी गरजेनुरूप शिक्षण पद्धती वापरून अध्ययन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक लवचिक,प्रभावी,सक्रिय ,मनोरंजक तसेच विद्यार्थी विकासास उपयुक्त ठरेल.
Comments
Post a Comment