पृथ्वीचे मानवाला पत्र (जागतिक ओझोन संरक्षण दिन)
प्रिय मानवास, अनेक प्रेमपूर्ण आशीर्वाद ... मी सुरुवातीपासून स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण,' जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपी गरीयसी' अशा अनमोल शब्दांमध्ये माझा गौरव केला गेला. माझ्या कुशीत जगणाऱ्या जीवसृष्टीच्या उभारणीमध्ये ऋषी, महर्षी, अध्यात्म शक्ती, व निसर्ग देवतेचा मोठा वाटा आहे. मी आदी-अनादी काळापासून लता,वेली यांनी बहरून गेले होते. तुझ्या सारख्या अनंत लेकरां बरोबर मी सुखासमाधानाने आयुष्याचा परमानंद घेत होते... पण, एक दिवस मला प्राण्या पक्षांच्या मधुर स्वरां ऐवजी जीवाचा आकांत ऐकु आला. यात वेदना व विरहाच्या संमिश्र भावना होत्या. दुःख दृश्य म्हणजे तुमचा एक बंधू धारदार कुऱ्हाडीने माझ्या डेरेदार हिरव्या लेकरावर घाव घालून मातेपासून अलग करू पाहत होता. तेव्हाच ठरवलं, तुम्हाला योग्य तो धडा शिकवायचा.आई निष्ठूर होत नाही, ती मारते ते खून करण्यासाठी नसून आपल्या मुलांना योग्य संस्कार करणे हा त्यामागचा तिचा शुद्ध मानस असतो. आता सांगितलेला प्रसंग लहानपणापासून आपण ऐकला असेल. नंतर काय होते तर वृक्षतोड तुम्ही करत होता तेव्हा कुऱ्हाड तुमच्याच कोणाच...