Posts

नवीन पोस्ट

आयुका :IUCAA ,पुणे

Image
२८फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ 'चंद्रशेखर व्यंकट रमण' यांनी 'रमण परिणाम'चा शोध लावला व त्यांना  या शोधा निमित्त 'नोबेल' पारितोषिक प्राप्त झाले आणि या दिवसाचे औचित्य साधून २८फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. त्या दिवशी सर्वांसाठी ज्ञान विज्ञाचा अमूल्य खजाना खुला करण्यासाठी सुसज्ज  असते आपल्या जयंत नारळीकर सरांची 'आयुका'.  पुणे विद्यापीठाच्या आवारात एक संशोधन संस्था 'आयुका' नावाने सुप्रसिद्ध तसेच अत्यंत लोकप्रिय आहे.१९८८ मध्ये जागतिक  दर्जाची ख्याती असणारे  खगोलशास्त्रज्ञ 'जयंत नारळीकर' यांनी अजित केंभावी व नरेश दधीच यांच्यासोबत आयुकाची स्थापना केली. विज्ञान प्रेमींना आपला विज्ञान दिवस अविस्मरणीय घालवायचा असेल तर पुण्यातील आयुका सारखे उत्तम ठिकाण दुसरे नसेल. विद्यापीठातील प्रवेशद्वारापासून पायी चालत जाताना विद्यापीठातील भुलभुलय्या ठरलेले रस्ते जरा वेळ घेत असत, पण आता तीही समस्या गायब झाली आहे.जवळच इको-फ्रेंडली बस येते व विद्यापीठांमध्ये हवे त्या  ठिकाणी सोडते, ते ही अगदी विनामूल्य. विज्ञान

नोबेल पारितोषक:भारताची सद्यस्थिती(Nobel Prize:Current Situation of India)

Image
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या किमयागारांना नोबेल पारितोषिकाने पुरस्कृत केले जाते. काळाच्या किनाऱ्यावर तुमची पावले ठसवायची असतील तर तुमचे पाय फरपटून देऊन कसे चालेल? हे वाक्य आपल्या भारतीय तरुणांना उद्देशून वापरावेसे वाटते कारण, नोबेल पारितोषिकाची सुरुवात झाल्यापासून ते आजतागायत आपल्या देशाच्या वाट्याला हातावर मोजता येतील एवढीच नोबेल पारितोषके मिळालेली आहेत, यामध्ये रवींद्रनाथ टागोर, सी. व्ही. रमण, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, हरगोविंद सिंग खुराणा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, व्यंकटरमण रामकृष्णन, अभिजीत बॅनर्जी या व्यक्तींचा समावेश होतो. या व्यक्तींनी आपल्या जीवनातील आंतरिक ऊर्जेचा जादुभरा स्रोत वापरून जी भरीव कामगिरी केली तिला व्यवसाय कधीच बनू दिले नाही त्यास ध्यास, ध्येय व धर्म बनवले व पूर्ण कार्यक्षमतेने कार्य केले. आजही पालक आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची स्वप्ने पाहतात. यामध्ये किती पालक आहे जे आपल्या पाल्यांना

चुंबक

Image
मॅग्नेटाईट नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणार्‍या एक प्रकारच्या पदार्थाचा दगड. त्याचे  'लोडस्टोन' असे नाव होते.या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते. ख्रिस्तपूर्व ८०० च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे.जाणून घेऊया  चुंबकाविषयी...                       चुंबक

रामानुजन

Image
श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; मृत्यू : कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. या महान गणित्तज्ञा वर बोलू काही...               रामानुजन गणितज्ञ रामानुजन होते महान संपूर्ण जगात आजही त्यांना मानाचे स्थान प्रतिभावंत बुद्धीला   जग आजही करते सलाम कायच अलौकिक आहे दुनियेचा त्यास सलाम अंकांची त्यांची दुनिया अंकांमध्ये व्यस्त असत अंक हा त्यांचा ईश्वर, अंकांची पूजा करत २२ डिसेंबर १८८७  या दिनी चिरस्मरणीय मंगलमय घटना घडली या क्षणी या मंगल दिनी रामानुजन यांचा जन्म गणिताच्या इतिहासात नवव्या प्रतिमेस मिळाला पुनर्जन्म पाचव्या वर्षी सुरू केला विद्याभ्यास आपल्या कुशाग्र बुद्धीने शिक्षकांचे बनले ते खास गणितामध्ये प्रथम येणे होते त्यांचे स्वप्न त्यासाठीच अप्पर प्रायमरी परीक्षा तयारी असायचे ते मग्न ४२/४५  गुण मिळवले अंकगणितात पैकीच्या पैकी गुण नसल्याने बुडाले दुःखात पहिला शोधप्रब

विज्ञानवाटा

Image
आईन्स्टाईन कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होता हा आदर भाव ठेवणे अतिउत्तम आहे पण आपण सर्वसामान्य आहोत, विज्ञान समजण्याची कुवत असतानाही या बाबतीत मनात विचार आणणे ही महापाप आहे. काय झाले आपण न्यूटन आइन्स्टाईन नसलो तर मनातील उत्कंठा शमवण्यासाठी अशा ज्ञानपिपासू नी आपलं लॉजिक विकसित करणे व प्रयोगाची तयारी ठेवली तरी विज्ञानवाटांवर हे ज्ञान पिपासू आनंदाने चालू शकतात. आता म्हणजे नक्की काय करायचं, हे सुचवणारा हा 'विज्ञानवाटा' नावाचा लेख...    विज्ञान, विज्ञान म्हणजे खुप गंभीरतेने वाचण्यासारखा किंवा आंबट तोंड लांब चेहरे करून ऐकण्यासारखा विषयच नाही. फक्त सैद्धांतिक माहिती वाचून किंवा सांगून माहितीचा भरमसाठ साठा करणाऱ्या प्रियजनांना सांगावेसे वाटते, आपल्या आयुष्यात विज्ञान अनुभवता आले पाहिजे, आपण त्यामध्ये जगलो पाहिजे, दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या समस्या व त्यांचे समस्या निराकरण होताना असणारी विज्ञानाची भूमिका म्हणजे खरे विज्ञान प्रेमी आयुष्य.एकंदरीत म्हणायचे झाल्यास, ज्ञानाचे उपयोजन करणे म्हणजेच प्रयोग करणे व आपल्याला काय करता येईल हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. जेवढ्या नेमकेपणाने, टोकदा

संतुलित आहार म्हणजे काय ,तो का व कसा घ्यावा?

Image
शरीरक्रियाशास्त्रामध्ये आहार हा महत्त्वपूर्ण विषय आहे. शालेय जीवनात विज्ञानाच्या  पेपर ला घोकंपट्टी करून उत्तरं लिहितो व आहाराशी असणारा संबंधास  आहुती देतो. पृथ्वी व मानवाचा जितका प्राचीन इतिहास आहे, तितकाच मानव व त्याचा आहार आणि त्याच्याशी संबंधित असणारे आजार यांचाही ऋणानुबंध पुरातन आहे. पाषाण युगात १० ते १२ हजार वर्षांपूर्वी झालेली क्रांती व मानवाने केलेली शेती यामुळे अन्न शोधाची समस्या कायमची  संपुष्ट झाली व मानवाच्या आयुष्यात स्थैर्य प्राप्त झालं. तुम्ही काय खाता,यावरून तुम्ही कसे आहात हे आहार तज्ज्ञ तुम्हाला सांगतात. कारण आपण जे खातो त्यातून आपल्या मन  व शरीरावर परिणाम होत असतो. अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिनां देहमाश्रित: । प्राण पान समा युक्त: पचाम्यन्न चतुविर्धम।।  गीतेच्या पंधराव्या अध्यायातील १४ वा श्लोक थोडक्यात हेच सांगतो की अन्नातून विविध पोषक पदार्थ ऊर्जा मिळवण्यासाठी वापरले जातात यामध्ये पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, तसेच सेंद्रिय पोषक पदार्थ इत्यादींचा समावेश होतो.अन्न  कशाचा बनतं?त्याचं शरीरात काय होतं व त्याचे व रोगाचे काही समीकरण असते का? यांसार

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)

Image
 'संन्याश्यासारखा विचार करा' या पुस्तकाची प्रस्तावना  तुम्हाला नवीन कल्पना हवी असेल, तर जुने पुस्तक वाचा. (इव्हान पावलॉव) मी अठरा वर्षांचा होतो आणि लंडनमधील कास बिझनेस स्कूल या महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी माझ्या एका मित्राने मला त्याच्याबरोबर एका संन्याशाचं व्याख्यान ऐकायला येण्यास सांगितलं. मी विरोध केला. ‘एखाद्या संन्याशाचं व्याख्यान ऐकायला मी का जावं?’ महाविद्यालयाच्या परिसरात मी नेहमीच सीईओंना, प्रसिद्ध व्यक्तींना आणि इतर यशस्वी लोकांना व्याख्याने देताना पाहत होतो; पण मला एखाद्या संन्याशामध्ये बिलकूल स्वारस्य नव्हतं. ज्या लोकांनी प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात काही गोष्टी मिळवलेल्या आहेत, अशा वक्त्यांचं व्याख्यान ऐकण्यास मी प्राधान्य देत होतो.  माझ्या मित्राने आग्रहच धरला आणि अखेरीस मी म्हणालो, ‘जर त्यानंतर आपण बारमध्ये जाणार असलो तरच मी येईन.’ ‘प्रेमात पडणं’ हा वाक्प्रचार जवळजवळ नेहमीच अगदी निर्णायकपणे शृंगारिक नातेसंबंधांचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो; पण त्या रात्री मी त्या संन्याशाला त्याचे अनुभव सांगताना ऐकलं आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो. व्यासपीठा

जेव्हा जगण्याची दिशा हरवली आहे असं वाटू लागतं, तेव्हा खंबीर मार्गदर्शक बनणाऱ्या 'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही... Think Like a Monk - Jay Shetty (Marathi)

Image
(अमेझॉनवर पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.) 'संन्याशासारखा विचार करा' पुस्तकाविषयी काही... जय शेट्टी यांच्या पुस्तकामध्ये संन्याशाची मनोरचना स्वीकारण्याचे तीन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा हा आपल्याला मागे खेचणाऱ्या बाह्य प्रभावांपासून, अंतर्गत अडथळ्यांपासून आणि भीतींपासून आपली सुटका करून घेणं म्हणजेच त्या गोष्टी सोडून देणं हा असतो. याला आपण ‘सोडून द्या’. किंवा ‘जाऊ द्या’ असं म्हणतो. वाढीसाठी जागा मिळवण्याकरिता करावयाची साफसफाई म्हणून आपण याचा विचार करू शकतो. ‘आपली वाढ कशी होत राहील', हा दुसरा टप्पा असतो. तुम्हाला हेतू, उद्दिष्ट आणि आत्मविश्वास यांच्यासह निर्णय घेणं शक्य व्हावं, यासाठी तुमच्या आयुष्याची पुन्हा नव्याने जडणघडण करण्यास या टप्प्याची तुम्हाला मदत होईल. आपल्या पलीकडचं जग पाहून, आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना व्यापक बनवून आणि ती इतरांशी वाटून घेऊन, तसंच आपले नातेसंबंध अधिक सखोल, दृढ बनवून ‘आपण मुक्तहस्ते देऊया’ हा टप्पा येतो. आपल्याला लाभलेल्या देणग्या आणि प्रेम आपण इतरांशी वाटून घेतो आणि आपल्याला खऱ्या आनंदाचा

पृथ्वीचे मानवाला पत्र (जागतिक ओझोन संरक्षण दिन)

Image
 प्रिय मानवास,  अनेक प्रेमपूर्ण आशीर्वाद ...        मी सुरुवातीपासून स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण,' जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपी गरीयसी'   अशा अनमोल शब्दांमध्ये माझा गौरव केला गेला. माझ्या कुशीत जगणाऱ्या जीवसृष्टीच्या उभारणीमध्ये ऋषी, महर्षी, अध्यात्म शक्ती, व निसर्ग देवतेचा मोठा वाटा आहे. मी आदी-अनादी काळापासून लता,वेली यांनी बहरून गेले होते. तुझ्या सारख्या अनंत लेकरां बरोबर मी सुखासमाधानाने आयुष्याचा परमानंद घेत होते... पण, एक दिवस मला प्राण्या पक्षांच्या मधुर स्वरां ऐवजी जीवाचा आकांत ऐकु आला. यात वेदना व विरहाच्या संमिश्र भावना होत्या. दुःख दृश्य म्हणजे तुमचा एक बंधू धारदार  कुऱ्हाडीने माझ्या डेरेदार हिरव्या लेकरावर घाव घालून मातेपासून अलग करू पाहत होता. तेव्हाच ठरवलं, तुम्हाला योग्य तो धडा शिकवायचा.आई निष्ठूर होत नाही, ती मारते ते खून करण्यासाठी नसून आपल्या मुलांना योग्य संस्कार करणे हा त्यामागचा तिचा शुद्ध मानस असतो. आता सांगितलेला प्रसंग लहानपणापासून आपण ऐकला असेल. नंतर काय होते तर वृक्षतोड तुम्ही करत होता तेव्हा कुऱ्हाड तुमच्याच कोणाच्यातरी पायावर पडते म्हणजेच, ऑक्सिजनच

आकाश कवेत घेताना... (अवकाश निरीक्षणाच्या इतिहासावर ओझरती नजर)

Image
सहज काल रात्री आकाशाकडे  लक्ष गेले असता  मनात विचार आला... २००९ साली ' आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष ' साजरे केले परंतु अजूनही आपणास या या कधी निळेभोर तर कधी काळ्याकुट्ट कधी लालसर छटा पसरलेल्या तर कधी चमचम करणाऱ्या चांदण्यांनी सुशोभित होणाऱ्या अश्या अवकाशाची नेमकी व अद्ययावत स्वरूपाची  माहिती नाही ही खंत मनात वाटली. जॅने टेलर यांनी लिहिलेली, "Twinkle twinkle little star, How I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky" या कवितेच्या ओळी सहज ओठांवर आल्या. खरंच आकाशातील चंद्र चंद्र सूर्य आणि चांदण्यांची विलोभनीय मांडणी  आदिम काळापासून मानवाला भूल पाडत आली आहे, असा विचारही मनात आला.  मानवाला प्राचीन काळापासून खुणावणाऱ्या आकाशाचे, आकाशातील घटनांची शास्त्रीय दृष्टिकोनातून निरीक्षणे करणे कधी सुरू झाले हा प्रश्न मनात आला आणि या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले खरेतर ही निरीक्षणे केव्हा सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येणे शक्य नाही, पण सर्वात प्राचीन वेधशाळा म्हणावी अशी जागा इंग्लंडमध्ये 'सॅलिसबरी' च्या टेकडीवर आहे असे